Tuesday, July 8, 2014

होमिओपथि आणि मधुमेह:

खूप दिवसापासून रात्रीच्या लाघवीचे  प्रमाण वाढले कि तज्ञ डॉक्टर लाघवी तपासण्याचा सल्ला देतात आणि ती रक्तात तपासनीस आढळून आली कि मधुमेह आहे हे सिद्ध झाले म्हणजे सकाळी अनुश्या पोटीची रक्तातले साखरेचे प्रमाण ११० च्या वर व दुपारच्या जेवणानंतरचे रक्तातील साखरेचे प्रमाण १४० च्या वर. मग काय नको ते पथ्ये आणि औषधे, एक प्रकारची नवीन बायको असे म्हणून तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे असा एक सर्व सामन्यामध्ये समज- गैरसमज.

पण नक्की मुधुमेह म्हणजे काय हे जाणून घ्या आणि मग कोणती पथ्ये व उपचार हे ठरवूयात.
मधुमेह हा दोन प्रकारचा आहे १. इन्सुलिन वर अवलंबून असणारा , २. इन्सुलींवर अवलंबून नसणारा, ३. गर्भारपणात   होणारा  मधुमेह
आता इन्सुलिन वर अवलंबून असणारा मधुमेह हा असा मधुमेह आहे कि तो बाहेरून इन्सुलिन घेतल्यावरच तो आटोक्यात आणता येतो आणि जास्त करून ४५ वयाच्या  आधी  येतो  आणि इन्सुलींवर अवलंबून नसणारा मधुमेह हा फक्त गोळ्या औषधाने आटोक्यात आणता येतो व तो ४५ नंतर होतो. तिसरा प्रकार हा जन्मताच लहान मुलांना होतो तो गर्भारपणातच आईकडून मुलाला येतो व आईला पण असतो  तर हा मुल जाल्म्ल्यानंतर कधी कधी निघून जातो पण मुलांना भविष्यात  येण्याची संभावना दाट असते.

आता आपण मधुमेहाची अजून काही लक्षणे लक्ष्यात घेऊ. अचानंक वजन घटने, वारंवार लघवीला लागणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, डोळ्यांसमोर अंधार्या येणे ई.

मधुमेहाची का होतो ह्याची करणे आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे. मधुमेह १ जा जास्त करून autoimmune ( स्वतःचे शरीर स्वतःबद्दल भांडते) प्रक्रियेमुळे होतो ज्यामध्ये pancreas (स्वादुपिंड) बीटा सेल ऑफ  इस्लेट ऑफ लांगार्हन ह्या पेशी ज्या इन्सुलिन (साखर कमी करणारा रक्तातील एक घटक) तयार करतात त्यांची कमतरता करून इन्सुलिनचे वहन कमी करतो. इथे ह्या पेशी मरण पावतात परिणामी इन्सुलिन तयार होण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी इन्सुलिन कमतरतेमुळे  रक्तातील साखर परिणामी कमी न झाल्याने मधुमेह होतो. हा अनुवांशिक मधुमेह पण आहे. ह्याचे प्रमाण जवळ जवळ पूर्ण मधुमेह रुग्णांच्या १० % असते.

मधुमेह २ हा इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेत बाधा आल्यामुळे होतो आणि बाधा येण्याचे कारण स्पष्ट नाही. पण आपल्या अनुवंशिकते नुसार, खाण्यापिण्याच्या सवयीनुसार, मानसिक ताण, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि शहरीकरणामुळे हा २ प्रकारचा मधुमेह होतो. ह्याचे प्रमाण जवळ जवळ पूर्ण मधुमेह रुग्णांच्या  १०० % असते.

मधुमेह ३ हा इन्सुलिनच्या कमतरते मुले पण गर्वोधारपानांत होतो. पण बर्याच वेळा प्रसूती झाल्यावर निघून जातो.

मधुमेहसाठी ३-४  रक्त तपासण्या केल्या जातात त्या म्हणजे नाष्ट्या पूर्वीची तपासणी व जेवणानंतर २ तासा नंतरची तपासणी आणि लाघवी तपासणी. अजून एक तपासणी आहे ती म्हणजे HBA1C कि जी तुमच्या ३ महिन्याच्या  रक्तातील साखरेचे प्रमाण सांगू सकते व ते प्रमाण ६.५ च्या कमी असावे लागते.

आता आपण हा मधुमेह टाळू कसा शकतो हे पाहूयात. ह्यासाठी आपल्याला दररोज व्यायाम व चालणे, योग्य आहार, योग्य वजन घेणे जरुरी आहे व आपल्या दारू, धुम्रपान ह्या सवयी ताबडतोब बंध किंवा प्रमाणात घ्यावे लागतील. खाण्यामाडे वनस्पती तेल, मासे, कडधान्य ई. दररोजच्या आहारात सेवन करणे गरजेचे आहे.

मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम तसे अनेक आहेत पण महत्वाचे म्हणजे हृदयरोग, डोळ्यांचे आजार, झोप न लागणे, हातापायाला मुंग्या येणे व आग होणे, गंग्रेने, कमजोरी, लैगिक कमतरता ई.

वैदकीय क्षेत्रात तसे बर्याच उपचार पद्धती उपलब्ध आहे पण होमोपथि हि अशी एक उपचार कि जी कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न करता मधुमेह आटोक्यात आणते व मधुमेहमुळे होणारे दुष्परिणाम घालवून तुम्हाला सामान्य आयुष्य जगता येते. ह्या उपचार पद्धतीने तुमचा तत्काळ झालेला मधुमेह कायमचा बारा होतो आणि जुना झालेला मधुमेह लवकर आटोक्यात येउन तुम्ही आनंदी व उत्साही जीवन जगू सकता. ह्या साठी तुम्ही तज्ञ होमोओपथिक डॉक्टरांकडून सल्ला घेऊन औषधे चालू करू शकतात. त्याच बरोबर तुमची जीवन शैली व खाण्यापिण्याच्या सवयीमधे खाण्याचा प्रकार आणि प्रमाण आणि वेळ ठरवू शकतात.

माझे सर्व मधुमेह रुग्ण आम्ही  सांगितलेलं जेवण व व्यायाम  केल्यामुळे  मधुमेह औषध न घेत आटोक्यात आणू शकता व पूर्ण बारा करू शकता. ह्यामध्ये तुमचे कोणत्याही प्रकारचे जेवण बंद केले जात नाही तर त्याचे प्रमाण व प्रकार व वेळ ठरवून दिली जाते.

सकाळी नसता : पोहे १-२ प्लेट ,
राव ,उपमा शिरा (साखर,मीठ, मिरची, तेल टाकून) १ प्लेट,
इडली, डोसा( भाजी  न घेता) घावन, ढोकला, कुरमुरे  ई.
चहा + मारी भिस्कीट ५-६.

दुपारचे जेवण : सर्व प्रकारचे फळे मीठ मिरची टाकून : पहिला दिवस
सर्व प्रकारचे कडधान्य रात्रभर भिजत ठेऊन किंवा उकडलेले मीठ मिरची टाकून तसेच खा. प्रमाण नाही,

रात्रीचे जेवण: सर्व करू शकतात  ह्यामध्ये चिकन, मटन, अंडे, मासे, चापती, भाकरी ई सर्व. कोणतेही प्रमाण नाही. कारण रात्री जेवण करून आपण १२ तास तरी रात्री आपण काही खात नाही पण हे दिवसा होत नाही.

सूचना; १.हे जर असेच्या असे केले तर महिन्याला ३-४ किलो वजन कमी होते पण वजन कमी होताना कमजोरी येत नाही कारण फळे, कडधान्य भरपूर प्रमाणात असल्याने सर्व प्रकारचे विटामिन आणि मिनरल्स मिळतात त्याने कमजोरी व थकवा जाणवत नाही.ह्यातून साखर कमी मिळते व प्रोटीन जास्त असतात ती प्रतेक्ष्यरित्या रक्तातील साखर वाढवत नाहीत.
२. दररोज ४०-४५ मिनिट चालेने गरजेचे आहे व ३-४ लिटर पाणी पिणे महाय्वाचे आहे.
३.तिन्हीही जेवण मध्ये काहीही खायचे नाही. भूक लागल्यास जूस साखर न टाकता, सलाड, कड धान्य खावेत.
४. सूप, जूस जेवानंतर घ्या
५. एकदा एकाच पदार्थ खा आणि रेगुलर जेवण टाळा. जसे आंबा 1 खा पण मग बाकीचे काही खाऊ नका. जेवण मिक्स करू नका.
६. सोयाबीन,सूर्यफूल तेल वापर व एका महिन्याला एकाच लिटर तेल एका माणसाला वापरा.

अश्या जेवणाने तुमचे वजन कमी होते व परिणामी साखर आटोक्यात राहते.
मधुमेहाला भिऊ नका सामोरे जा आणि कायमचे दूर करा हाच जागतिक मधुमेह दिनाच्या दिवशी संकल्प करूयात.
Happy world diabetic day .








शरीरात घाम तयार करणाऱ्या विशिष्ट ग्रंथी असतात. काखेत, जांघेत, तळहातात, तळपायातही या ग्रंथी असतात. काही जणांना ऋतू कोणताही असला तरी प्रचंड घाम येतो. या व्यक्तींचे हात नेहमी घामामुळे ओले राहतात, तर काही जणांना घाम खूप कमी येतो. घामाचा वास येणे खरे त्रासदायक असते. घामात 'अमोनिया' हा प्रमुख घटक असतो. या अमोनियाचे विघटन झाले की घामाला वास येतो. काहींच्या घाम तयार करणाऱ्या ग्रंथी खूप जास्त काम करतात. त्यांना अगदी वातानुकूलित खोलीत बसल्यावरही घाम येतोच.
घामाला उपाय काय?
* शरीराची नियमित स्वच्छता ठेवणे हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय.
* खूप घाम येत असेल तर त्वचा कोरडी ठेवण्यासाठी टाल्कम पावडर लावण्याचा फायदा होतो.
* काही जणांना पायाच्या बोटांमध्ये घाम येऊन ओलावा राहिल्यामुळे चिखल्या होतात.
* तळपायांना फारच घाम येत असेल तर दिवसातून दोन वेळा पायमोजे बदलावेत.
* घामाचा वास मारण्यासाठी अनेक जण 'डीओडरंट' मारतात. पण डीओ घाम न येण्यासाठी मदत करीत नाही हे लक्षात ठेवावे. थेट त्वचेवर डीओ मारल्यामुळे काहींना अ‍ॅलर्जी येते. सतत डीओ वापरल्यास त्या जागची त्वचा लालसर होऊ शकते, तिथे पुरळ आणि खाजही येऊ शकते.
* केसांमध्येही घाम येत असतो. या घामामुळे केसांच्या मुळांना जंतुसंसर्ग होणे, डोक्यावरच्या त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे केस वेळच्या वेळी श्याम्पू वापरून धुणे आणि ते पूर्ण सुकवणे आवश्यक असते. प्रसंगी ओले केस सुकवण्यासाठी 'हेअर ड्रायर'चा वापर केला तरी चालेल. पण केस ओलसर राहू देऊ नका.
* घामाचा फारच त्रास होत असेल तर योग्य वेळी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
घामाच्या दरुगधीचा पचनाशी संबंध नाही
घामाला दरुगधी येत असेल तर त्या व्यक्तीचे पोट साफ नसणार, असे म्हटले जाते. ते खरे नाही. 'पचन चांगले नसले तर घामाचा वास येईल आणि पोट साफ असेल तर घामाचा वास येणार नाही,' असे नसते. घामातून बाहेर पडणाऱ्या अमोनियाचे विघटन झाले की घामाचा वास येणारच.
घामाचा असाही त्रास
क्वचित काही जणांच्या घाम तयार करणाऱ्या ग्रंथींपैकी 'अ‍ॅपोक्राइन' नावाच्या ग्रंथींना संसर्ग होतो. या संसर्गामुळे या ग्रंथी घाम बाहेर टाकू शकत नाहीत. घाम आतच अडकून राहिल्याने त्यात जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊन गळू तयार होते. त्या ठिकाणी सूज येऊन पू होतो. अशा वेळी प्रतिजैविके देऊन या ग्रंथी कोरडय़ा करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रतिजैविकांच्या प्रभावामुळे काही कालावधीसाठी या ग्रंथी कोरडय़ा होतात. पण पुन्हा त्यांना संसर्ग होतो. शस्त्रक्रिया करून घाम तयार करणाऱ्या ग्रंथी काढून टाकणे अवघड असल्यामुळे रुग्णांसाठी ही गोष्ट त्रासदायक ठरते.

होमीओपथि मध्ये ह्या प्रकाराला खूप चांगला इलाज आहे. होमिओपथिक औषध शरीराला पूर्ण शुद्ध करून घाम कमी होतो व मुख्य म्हणजे दुर्गंधी बंद होते. ह्यात कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नसून नैसर्गिकरीत्या समूळ नायनाट करता येतो.